पण आजही आम्ही असे पाहतो; की सावता माळी फक्त माळयांचा संत आहे, नामदेव फक्त शिंप्यांचा संत आहे, चोखा मेळा फक्त महारांचा संत आहे, गोरा कुंभार फक्त कुंभारांचा संत आहे. अशीच वाटणी का आम्ही नेहमी करणार आहोत? शिंपी समाजाला नाव देताना नामदेव शिंपी समाज असे म्हणतात. नामदेवांचे एवढे मोठे विश्वव्यापी काम! परंतु आज आम्ही काय त्यांना एका शिंपी समाजाचे प्रतीक मानणार? मी शिंपी समाजाला दोष देत नाही, पण आमची प्रवृत्ती कशी आहे पहा! जोतिबा फुल्यांनी सामाजिक क्रांतीचा संदेश दिला. त्या संदेशातून डॉ. आंबेडकर यांच्यासारखी कर्तृत्ववान, धगधगती माणसे निर्माण झाली. एक मोठी शक्ती निर्माण झाली. पण महात्मा फुले फक्त माळयांचे, डॉ.आंबेडकर फक्त बौध्दांचे, गांधी फक्त गुजराथ्यांचे, टिळक फक्त ब्राम्हणांचे, शिवाजी महाराज फक्त मराठयांचे अशा प्रकारे जर आम्ही या महापुरूषांच्या वाचण्या केल्या, तर हिंदुस्थानमध्ये सामाजिक क्रांती कधीच होणार नाही.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org